Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गुरुपौर्णिमा : गुरूंकडून मिळालेल्या वारशाबद्दल कृतज्ञता

गुरुपौर्णिमा : गुरूंकडून मिळालेल्या वारशाबद्दल कृतज्ञता दाजी - हार्टफुलनेसचे मार्गदर्शक आणि श्री राम चंद्र मिशनचे अध्यक्ष आपल्या शाळेच्या दिवसांत शिक्षक दिन साजरा करणे, आपल्या शिक्षकांना आनंद मिळवून देणे आणि त्यांना आनंदी केल्याबद्दल स्वतः आनंदित होणे हे आपल्या सर्वांना आठवते. मात्र, आज जेव्हा आपण गुरुपौर्णिमेबद्दल बोलत आहोत, तेव्हा हा दिवस काय सूचित करतो? सुज्ञतेच्या आणि ज्ञानाच्या मार्गावर आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या आध्यात्मिक शिक्षकांचा किंवा गुरूंचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. शैक्षणिक शिक्षकांचा उत्सव साजरा करणाऱ्या शिक्षक दिनाप्रमाणेच, गुरुपौर्णिमा आध्यात्मिक ज्ञान प्रदान करणाऱ्यांना आणि अज्ञानाचा अंधार दूर करण्यास मदत करणाऱ्यांना आदरांजली अर्पण करते. सर्व परंपरांमध्ये महत्त्व गुरुपौर्णिमा विविध परंपरांमध्ये साजरी केली जाते, आणि प्रत्येक परंपरेने त्या दिवसाला स्वतःचे एक अद्वितीय वैशिष्ठ्य बहाल केले आहे. वेदांच्या काळापासून, ऋषी व्यास यांच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमेला ‘व्यास पौर्णिमा’ म्हणूनही ओळखले जाते. वेदांचे संकलन करणारे आणि महाभारत आणि ब्रह्म सूत्र लिहिणारे म्हणून व्यास पूजनीय आहेत. त्यांच्या योगदानाने हिंदू धर्मातील गुरु-शिष्य परंपरेचा पाया रचला. या दिवशी व्यास ऋषींचा जन्म झाल्याचे म्हटले जाते. बौद्ध धर्मात, गुरुपौर्णिमा सारनाथ येथे दिलेल्या बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाचा सन्मान करते. धम्मक्कप्पवत्तन सुत्त म्हणून ओळखला जाणारा हा कार्यक्रम, त्याच्या अध्यापन प्रवासाची आणि संघाची (भिक्षूंचा समुदाय) स्थापना करण्याची सुरुवात दर्शवितो. योग परंपरेत, गुरुपौर्णिमा त्या दिवसाचे स्मरण करते जेव्हा ‘आदयोगी’ असलेल्या शिवाने सप्तऋषींना योगाचे ज्ञान प्रसारित करण्यास सुरुवात केली. या घटनेकडे योगातील गुरु-शिष्य परंपरेचे मूळ म्हणून पाहिले जाते. जैन धर्मात, हा दिवस त्रिनोक गुहा पौर्णिमा म्हणून ओळखला जातो, जो त्रिनोक गुहा आणि शिक्षकांची पूजा करतो. ही चातुर्मासाची सुरुवात दर्शवते, चार महिन्यांचा तीव्र आध्यात्मिक सराव. या दिवशी, महावीरांनी त्यांचे पहिले शिष्य गौतम स्वामी यांना दीक्षा दिली, अशा प्रकारे ते त्रिनोक गुहाच्या भूमिकेचे मूर्त स्वरूप बनले.
'गुरु' शब्दाची व्युत्पत्ती 'गुरू’ या शब्दाचा अर्थ 'अंधार दूर करणारा' आणि 'पौर्णिमा' म्हणजे पौर्णिमेचा दिवस. हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्यात (जून-जुलै) पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा हा दिवस सर्व आध्यात्मिक शिक्षकांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. हार्टफुलनेसमध्ये, गुरूंची भूमिका महत्त्वाची असते, जी 'अंधार दूर करणारा' म्हणून गुरूंच्या पारंपरिक समजुतीशी सुसंगत आहे. 'गुरु' हा शब्द दोन संस्कृत संज्ञांपासून आला आहे, 'गु' ज्याचा अर्थ आहे अंधःकार किंवा अज्ञान आणि 'रू', ज्याचा अर्थ आहे प्रकाश किंवा दूर करणारा. म्हणून, गुरू अज्ञानाचा अंधःकार दूर करतो आणि शहाणपण आणि ज्ञानाचा प्रकाश आणतो. हार्टफुलनेस पद्धतीमध्ये, गुरू किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकाकडे साधकाच्या आध्यात्मिक प्रवासाचे मुख्य सूत्रधार म्हणून पाहिले जाते. हार्टफुलनेस परंपरेत गुरूंची भूमिकाः हार्टफुलनेसच्या अद्वितीय पैलूंपैकी एक म्हणजे दिव्य ऊर्जेचे संप्रेषण, ज्याला प्राणाहुती म्हणतात. गुरूंनी दिलेले हे संप्रेषण, ध्यान अधिक सखोल बनवते, आध्यात्मिक प्रगतीला गती देते आणि सूक्ष्म शरीरांना शुद्ध करते. याला आंतरिक अंधःकार आणि अज्ञान दूर करणाऱ्या दिव्य कृपेचे थेट संचारण असे मानले जाते. ध्यानधारणा, शुद्धीकरण आणि आंतरिक संबंध यासारखे हृदयाचे चिंतनशील सराव हळूहळू हृदय आणि मन शुद्ध करून आंतरिक परिवर्तन सुलभ करतात. गुरू हे साधकांसाठी एक जिवंत उदाहरण म्हणून काम करतात. गुरू त्यांच्या स्वतःच्या जीवनाद्वारे आणि वर्तनाद्वारे साधकांना प्रेम, करुणा, विनम्रता आणि भक्ती यासारखे गुण जोपासण्यासाठी प्रेरित करतात. हे प्रत्यक्ष उदाहरण साधकांना प्रेरित करते आणि त्यांना त्यांच्या आध्यात्मिक उद्दिष्टांशी सुसंगत ठेवते. 'मानव विकासात सद्गुरूची भूमिका' या त्यांच्या पुस्तकात, 'हार्टफुलनेस' च्या शिक्षकांपैकी एक असलेल्या चारीजी यांनी गुरूंची तुलना 'टाइम ट्रॅव्हलर' शी केली आहे. त्यांच्या मते, साधकासाठी परिवर्तनात्मक प्रक्रिया सुरू करण्यासाठी गुरू भविष्यातून वर्तमानात येतात. गुरूंची चेतना इतकी विकसित झाली आहे की शिष्य आणि गुरू यांच्यातील चेतनेतील हा फरक अमीबा विरुद्ध मनुष्याच्या चेतनेशी तुलना करण्यासारखाच आहे. जेव्हा गुरू शिष्याच्या चेतनेच्या किंवा वैयक्तिक परिवर्तनाच्या उत्क्रांतीला गती देण्यासाठी साधकाच्या स्तरावर परत येतात, तेव्हा ते काल आणि अवकाशाच्या पलीकडे जाण्यासारखे असते. अशा परिवर्तनांना सुलभ करण्यासाठी गुरू जो बहुआयामी प्रवास करतात तो समजून घेण्यासाठी आपली वर्तमान चेतना संघर्ष करते. वेद व्यास, भगवान बुद्ध किंवा शाहजहॉंपूरचे बाबूजी महाराज यांसारखे प्राचीन गुरू अशा गहन आध्यात्मिक क्षमतांचे उदाहरण होते. आणखी एक कुतूहलजनक पैलू म्हणजे गुरूची आध्यात्मिक उपस्थिती प्रत्येक प्रामाणिक साधकाला त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाच्या वैयक्तिक गतीनुसार साथ देते. एखादी व्यक्ती वेगाने किंवा हळूहळू प्रगती करत असली तरी, गुरू त्याच्या गतीने त्याचा सोबत राहण्यासाठी जुळवून घेतात. तथापि, गुरूंच्या मार्गदर्शनाचा सक्रियपणे वापर करून आपल्या प्रगतीला गती देणे यातच आपला शहाणपणा आहे. माझे गुरू, बाबूजी महाराज म्हणाले की गुरू येथे सेवा करण्यासाठी आलेले असतात. कधीकधी, गुरू अप्रत्यक्षपणे शिष्याच्या सुप्त आध्यात्मिक आकांक्षा देखील जागृत करतात. कृतज्ञतेचा दिवसः आपल्या जीवनात सुज्ञता, कृपा आणि आशीर्वादांचे मूर्त स्वरूप असलेल्या गुरूंना देऊ केलेली गुरुदक्षिणा काय असू शकते? जेव्हा गुरूंनी अवतार घेण्याची निवड केली आहे, तेव्हा त्यांच्यासोबत या पृथ्वीवर जन्माला येण्याचा आशीर्वाद हा आपल्या सर्वात मोठ्या भाग्यांपैकी एक आहे. माझ्यासाठी, एक आकांक्षा स्पष्ट आहे - माझ्या गुरूंच्या कल्पनेनुसार पूर्णपणे रूपांतरित होणे, त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान करणे आणि आपल्या अंतःकरणातील सुप्त क्षमतेच्या बिजाचे संगोपन करून त्याचा फळांनी बहरलेला वृक्ष बनवणे, ज्यात सुप्त क्षमतेची असंख्य बीजे असतील ज्यामुळे या विशाल विश्वाला प्रेम, सौंदर्य आणि सूज्ञपणाच्या नंदनवनाने समृद्ध करता येईल. माझ्यासाठी, ही माझ्या प्रिय गुरूंप्रती कृतज्ञतेची अंतिम अभिव्यक्ती आहे. तुमच्याबाबतीत ती काय असेल?

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.